अचानक लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा भस्मसात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी या गावाशेजारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली .या आगीमुळे गावशेजारी दोन संत्राचे बागा जळून खाक झाल्या आहेत.

आग एवढी भीषण होती की बघता बघता जंगला पासून दोन किलोमीटर पर्यंत गावाजवळ आली. घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले .सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या. या वेळी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मात्रया आगीत दोन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाख रुपयांची बगीचे जळून खाक झाली आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. तर शेतकऱ्यांनी सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या आगीच्या घटनेने परिसरातील खळबळ माजली आहे.

Leave a Comment