कास भरला : सातारकरांची पाण्याची चिंता मिटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव व ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला कास तलाव सध्या तुडुंब भरला असल्याने तलावातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील कास परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी ओव्हरप्लो होवून वाहू लागले आहे. कास तलावातून जाणारे पाणी पुढे वजराई धबधब्याच्या रूपात कोसळत असल्याने भांबवली येथील वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे.

सातारा शहरात गेल्या तीन वर्षांपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम चालू आहे. सलग होत असलेल्या पावसाने जुलैमध्ये भरणारा तलाव यावर्षी रेकाॅर्डब्रेक जून महिन्यातच भरला आहे. कास तलाव भरल्याने यंदा पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा तलाव ब्रिटीश कालीन आहे. या तलावातून साता-यासह नजीकच्या 15 गावांना पिण्याचे पाणी नागरिकांना पूरविले जाते. हा तलाव सन 1885 कालावधीत बांधण्यात आला. याची क्षमता 107 दक्ष लक्ष घनफूट इतकी आहे. कास परिसरातील प्रसिद्ध असणारा एकीवचा धबधबा ओसंडून वाहत होता. माेठ्या प्रमाणात एकीव सातारा या डांबरी रस्त्यावर पाणी आले.

Leave a Comment