Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या ‘या’ गोष्टींचे पालन केल्यास तुमचंही जीवन होईल स्वर्गासारखं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आचार्य चाणक्यांच्या नीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. त्यांनी आपल्या नैतिकतेमध्ये यशाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीतीचे पालन केल्यास माणसाला सुख समृद्धी प्राप्त करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी माणसाने नेमकं कस वागावं कस राहावं याबाबत चाणक्यांनी काही तत्वे दिली आहेत. चला जाणून घेऊया अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या माणसाला रंकापासून थेट राजा बनवतील.

कष्ट- मेहनत

जगात असे अनेक लोक आहेत जे आपलया नशिबावर आणि देवावर अवलंबून असतात आणि कष्ट करायला तयार नसतात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी मानसिकता असलेले खूप लोक असतात. मात्र आचार्य चाणक्याच्या मते असं वागणं अत्यंत चुकीचे आहे. जे लोक सगळं काही देवावर आणि नशिबावर सोडून कष्ट न करता तसेच बसतात ते कधी आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे नशिबात काय असेल ते असेल, तुम्ही कष्ट करणं कधीही सोडू नका.

वाणी –

चाणक्यांच्या मते माणसाने नेहमी त्याच्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वाणी ही अशी गोष्ट आहे जी माणसाला नव्या उंचीवर सुद्धा घेऊन जाते आणि खड्डातही टाकू शकते. त्यामुळे माणसाची वाणी नेहमी गोड़ असावी. तसेच चाणक्यांच्या नीतीनुसार, मनुष्याने नेहमी सज्जनांच्या सहवासात राहून आपले व्यक्तिमत्त्व वाढवावे आणि चुकीचा मार्ग टाळावा.

कुटुंब-

आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या कमाईने संतुष्ट असतो, ज्याला पैशाचा अधिक लोभ नसतो त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तसेच जर कुटुंबात आज्ञाधारक पत्नी आणि मान सन्मान ठेवणारी मुले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य स्वर्गासारखे होते.