औरंगाबाद: गेल्या तीन दिवसापासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साठले आहे आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
त्याचबरोबर औरंगाबाद शहरातील ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान होताना आपण नेहमीच पाहतो. या वेळाही औरंगाबाद शहरातील कुबेर गेवराई येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कुबेर गेवराई येथे ढगफुटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात कच्चे घरही कोसळले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तेथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मोठ्या प्रमाणात शेतात आणि गावात पाणी शिरले होते.
पहा संपूर्ण व्हिडिओ
— Vivek sudhakar sathe (@Theyout69032197) June 10, 2021
— Vivek sudhakar sathe (@Theyout69032197) June 10, 2021