भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संकटात; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सिडनी । दक्षिण ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्णवाढीमुळे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे. टीम पेन, लबूशेनसह क्रिकेटपटूंना एडलेडहून न्यू साऊथ वेल्सला हलवले आहे. कसोटी मालिका (Test series) वाचवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाने ठोस पावलली आहेत.

१७ डिसेंबरपासून सुरू होणारी भारत ( India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट कसोटी मालिका (cricket Test series) सुरु होत आहे. मात्र, दक्षिण ऑस्ट्रेलियात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कसोटी मालिका अडचणीत सापडली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आहे. (Corona crisis)

याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात होणारी पहिली कसोटी होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडिया संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, साहा (विकेटकिपर), वृषभ पंत (विकेटकिपर), बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment