साऊथम्पटनच्या पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा, टीम इंडियाच्या कोचचे भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. या फायनलमध्ये निसर्गाचा अडथळा येत आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 3 आऊट 146 रन केले होते. कर्णधार विराट कोहली 44 रनवर तर अजिंक्य रहाणे 29 रनवर खेळत आहेत. साऊथम्पटनमधील परिस्थितीचा विचार केला तर या पिचवर 250 रनचा स्कोअर देखील पुरेसा असेल असे भाकीत टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी केले आहे.

काय म्हणाले विक्रम राठोड
“आम्हाला प्रत्येक सेशनमध्ये चांगली बॅटींग करावी लागेल. आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो तर या परिस्थितीमध्ये 250 रन देखील पुरेसे असतील. बॉल जुना झाल्यावर जास्त स्विंग होतो. न्यूझीलंडच्या बॉलर्लनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी या पिचवर रन देखील होत आहेत. हा खेळ असाच सुरू राहिल. बॉलर्सना नेहमी मदत मिळेल. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सेशनचा विचार करुन बॅटींग केली पाहिजे.” असे विक्रम राठोड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

विक्रम राठोड यांनी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची प्रशंसा केली. “विराट आणि अजिंक्यने चांगली बॅटींग केली. पण मी रोहित आणि शुभमनला अधिक श्रेय देईल. त्यांनी कठिण परिस्थितीमध्ये संयम दाखवला.आम्ही दिवसाचा शेवट चांगला केला आहे. रोहित आणि शुभमन आक्रमक खेळ खेळू शकतात. त्यामुळे बॉलरवर दबाव कायम राहतो. दुर्दैवाने ते दोघेही एकत्र आऊट झाले. पण या दोघांपैकी एक जण मोठा स्कोअर करेल अशी मला खात्री आहे. तसेच चेतेश्वर पुजारानेही भक्कम बॅटींग केली. टीममध्ये त्याचा एक रोल आहे. त्याने 50 पेक्षा जास्त बॉल खेळले. त्याला आता या सुरुवातीचे चांगल्या स्कोअरमध्ये रुपांतर करण्याची गरज आहे. तो ते लवकरच करेल,” असा विश्वासदेखील विक्रम राठोड यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment