नाशिक जिल्हा हादरला; २ चिमूकल्यांसह एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील ४ जणांची अज्ञाताकडून गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे हत्याकांड चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुकासह संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. या घटनेचे वृत्त ‘झी २४’ तास वृत्तवाहिनीने दिलंय.

समाधान अण्णा चव्हाण ( ३७), भरताबाई चव्हाण ( ३२), मुलगा गणेश ( ६), मुलगी आरोही ( ४) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घरात राहत होते. समाधान हा रिक्षाचालक आहे. तर त्याची पत्नी मोलमजुरी करुन आपला कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाधानही घरीच होता.

समाधान आणि त्यांचे कुटुंब रात्री झोपले असताना त्यांचा झोपेतच गळा चिरण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रात्रीची असून आज सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment