वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात, १९ प्रवासी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दिवाण खवटी गावाचे १९ वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून शनिवारी पहाटे निघाले होते.

मात्र पोलादपूरनजीक आंबेनळी घाटातून जात असताना त्यांची मिनीबस आड कुंभळवणे गावाजवळील तीव्र वळणावर अचानक झाडावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी बसचा ड्रायव्हर नितेश सावंतसह इतर चार जणांना गंभीर इजा झाल्याने त्यांना पुढील ऊपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment