हाथरस प्रकरणी प्रियांका गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ पाच प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी देशभरातून योगी सरकारचा निषेध केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे.

प्रियांका गांधींनी ‘हे’ पाच प्रश्न मोदी सरकारला विचारले-

1) सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.

2) हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये

3) आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमच्या संमती शिवाय पेट्रोल टाकून जाळण्यात का आल?

4) आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?

5) आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता??

पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत.तसेच पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणीही प्रियांका गांधींनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment