धक्कादायक! मैत्रिणीचा पाठलाग का करता अशी विचारणा केल्याने तरुणाचा निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील हसनी आश्रम परिसरातील लक्ष्मीनगर येथे मैत्रिणीचा पाठलाग का केला याचा जाब विचारल्याने आज एका तरुणाच्या डोक्यात बांबूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आकाश अशोक शिऱ्यापगोळ असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मित्र शशिकांत अण्णाप्पा कल्लोळी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या खून प्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश शिऱ्यापगोळ हा मूळचा कर्नाटक येथील गोकाकचा रहिवाशी आहे.

आकाशच्या डोक्यात बांबूने हल्ला करण्यात आला. डोक्याला जोरदार मार लागल्याने आकाशचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता आकाश मृत अवस्थेत आढळला तर शशिकांत जखमी असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धर्मेश कांबळे, संभाजी कांबळे, उमेश कांबळे, मनोहर कांबळे, गोरखनाथ खंडागळे, केशव सुरगोंडा, महेश उर्फ कुमार कांबळे याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांनी विनायक मनोहर कांबळे, आकाश उर्फ वामन प्रकाश गुरव, विशाल आण्णाप्पा कांबळे यांच्यासह खून केला असल्याची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment