हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक!! थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभर या घटनेचा निषेध केला जात असून अनेक राजकिय पक्षांनी या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार वर निशाणा साधला आये. त्यातच आता या घटनेनंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली असून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साकडे घातले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. हाथरस येथे घडलेल्या निर्दयी घटनेची माहिती गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना पत्राद्वारे दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणलं आहे. या भयंकर घटनेमुळं देशभरात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळं या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत,’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींकडे काही मागण्या केल्या आहेत.

शिवसेनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे –

  • आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन दिला जाऊ नये.

  • या प्रकरणात पुरेशे आणि योग्य पुरावे सादर केले जावेत.

  • साक्षीदारांना पोलिसांकडून पूर्ण सुरक्षा दिली जावी.

  • या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीसाठी अनुभवी व कार्यक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.

  • या प्रकरणी न्यायालयात वेळीच आरोपपत्र दाखल केले जावे.

  • आरोपींना फाशी व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या वकिलांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत द्यावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment