जेएनयूचा हल्ला पाहून मला २६/११ ची आठवण झाली – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेएनयूमध्ये ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना मारलं जात होतं ते पाहून मला २६ नोव्हेंम्बर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बोलले आहेत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा आणून, त्यांच्यावरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचंही ठाकरे पुढे म्हणाले.

Leave a Comment