“महाविकास आघाडीचे सरकार दाऊद समर्पित”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारला आम्ही अनेक प्रश्नावरून घेरणार आहोत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभे आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारमधील काही लोक अजूनही दाऊदची धुणी भांडी करतात. हे सरकार दारूला समर्पित आहे. हे सरकार दारूला समर्पित आहे. या अधिवेशनात सरकारचा अहंकार उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

भाजपच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले आहे. आम्ही काहीही झाले तरी या अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. नवाब मलिकांचा राजीनामा काहीही झाले तरी आम्ही मागणारच आहोत. आम्हाला चहापाण्याला बोलवलं जात आहे. काहीही झाले तरी आम्ही चहा पाण्याला जाणार नाही.

उद्याच्या अधिवेशनात घोषित केलेल्यांना कर्जमाफी, आणि नियमित फेडणाऱ्यांना अनुदान, याबाबतही आमचा आग्रह असणार आहे. मराठा-ओबीसी आरक्षण हे दोन्ही मोठे विषय, खरं म्हणजे छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावं लागणं हे वाईट, आताही सरकार ते आश्वासन पूर्ण करेल याबाबत सांगता येत नाही. आधी सुरु असलेल्या योजनाही बंद केल्या. महाज्योती बंद पाडण्याचं काम सरकारने केले आहे. ओबीसींवर सरकारचा इतका राग का आहे, हा प्रश्न पडतो. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू,असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Leave a Comment