सदाभाऊंच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

सदाभाऊ खोत यांच्या जीवाला धोका आहे अस मला काही वाटत नाही, की त्यांच्या जीविताला धोका आहे. पण तरीही त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे. ती लक्षात घेता आणि त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सदाभाऊ यांची यांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत.

सदाभाऊंचा नेमका आरोप काय-

दरम्यान, या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केला आहे. माझ्या जीवाला पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून धोका आहे. ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझं त्यांना सांगणे आहे की, माझा प्राण गेला तरी चालेल. पण तुमची ही व्यवस्था, मस्तवाल पणाने उभा राहिलेला चिरेबंदी वाडा पाडल्या शिवाय सदाभाऊ शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment