एक बाधित, अख्ख कुटुंब बाधित करतो ; तेव्हा वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जाण्याचे पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, ‍‍‍शिवाजी सर्वगोड, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, संदीप मांडवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकरी उपस्थित होते.

राज्य शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. राज्याचे अधिक बजेट हे आरोग्यावर खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाला उपचार मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्गाची पुढच्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने राज्य शासन योग्य ते नियोजन करीत आहे. 31 मे पर्यंत राज्यासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 1 जूनपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास जून महिन्यातही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा लागले, याला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

Leave a Comment