अंघोळ करताना या ठिकाणी चुकूनसुद्धा लावू नये साबण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय सांस्कृतिकसकाळी उठल्या उठल्या अंघोळ करण्याची सवय आहे. अनेकांना सायंकाळी बाहेरून आल्यानंतर सुद्धा अंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते आहे. आंघोळ केल्याने केवळ ताजेपणा येत नाही तर आपल्या शरीरावरील घाण आणि दुर्गंधी ही निघून जाते. त्यामुळे तुमचे शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने अशा काही चुका करतो ज्याचा आपल्या शरीरावर चुकीचा प्रभाव पडतो. कधी कधी काही चुकीच्या ठिकाणी साबण अजाणतेपणी लागून जातो. पण त्यासाठी काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. आंघोळ करताना कधीही शरीराच्या या दोन भागांवर साबण लावू नये. याबद्धल माहिती आज जाणून घेऊया…

नेहमी अंघोळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, आंघोळ करताना डोळ्यांजवळ कधीही साबण लावू नये. कारण केमिकल साबणाचा उपयोग करण्यात वापरला जातो आणि जर केमिकलपासून बनविलेले साबण आपल्या डोळ्यांत गेले तर ते आपल्या डोळ्यांना खूप त्रास देऊ शकते.

अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे जननेंद्रिय हा एक भाग आहे ज्यावर साबण आंघोळ करताना जननेंद्रियांवर कधीही साबण लावू नका, कारण तेथील त्वचा थोडी नाजूक आहे. अशा परिस्थितीत खाज सुटणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

काही लोकांना अनेक चुकीच्या सवयी असतात. त्यामध्ये कधीकधी बरेच लोक आंघोळी नंतर टॉवेलने शरीरावर घासतात आणि त्यांना असे वाटते की असे केल्याने त्वचा अधिक स्वच्छ होईल, परंतु तसे होत नाही. आंघोळीनंतर टॉवेलने त्वचेला चोळल्यास त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे केस गळण्याचा धोका निमार्ण होतो. काही लोक आंघोळ करताना दोन किंवा तीन वेळा साबण वापरतात, परंतु आंघोळ करताना जास्त प्रमाणात साबण देखील वापरला गेल्यामुळे अति घाम येणे आणि त्वचा कोरडी होणे अश्या समस्या निर्माण होतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment