महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात; एकनाथ खडसेंचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल, असा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला आहे. यादरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात असे वक्तव्य केले आहे.

यावेळी राज्याच्या राजकीय निर्णयांमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्यामुळे अनेक निर्णय राष्ट्रवादीच्या बाजूने झाले असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. शरद पवारांनी बैठका घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता आणली होती याची देखील आठवण खडसे यांनी यावेळी करून दिली.

तसेच शिंदे गटाचे 50 आमदार अस्वस्थ असल्याचा दावाही एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये मंत्रिपद मिळण्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय