शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदार – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी / राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदारअसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. भाजप सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण चुकीचे असल्याने मागील दोन वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एरंडोल येथे जाहीर सभेत केला.

जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार येथे आले होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की मनमोहन सिंग सरकारच्या काळात ३५० कोटीच्या राफेल विमान आता ६६० कुठला घेतला जात आहे यावरून मोदी सरकारचा राफेल घोटाळा हा जनतेसमोर आला आहे .

शेतकऱ्यांना हे सरकार गांभीर्याने घेत नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयी सरकारला काही वाटत नाहीये अशी टीकाही यावेळी शरद पवार यांनी केली.यावेळी व्यासपीठावर गुलाबराव देवकर , माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

इतर महत्वाचे –

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

एकदिलाने काम करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणू – शिवेंद्रराजे भोसले

चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती

Leave a Comment