केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या-“अर्थव्यवस्थेत चांगली रिकव्हरी झाली आहे”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिवाळीच्या अगोदर माध्यमांना संबोधित करत आहेत. आज सर्वप्रथम त्या म्हणाल्या की, अर्थव्यवस्था सुधारत आहे. मूडीजने 2020 आणि 2021 या कॅलेंडर वर्षातील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज देखील वाढविला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार नवीन प्रोत्साहन पॅकेज (New Stimulus Package) जाहीर करेल. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेन्टिव्स (PLI – Production-Linked Incentives) योजनेस मंजुरी दिल्यानंतर सरकारकडून ही घोषणा केली जात आहे. 11 नोव्हेंबर रोजी सरकारने 10 क्षेत्रांसाठी असलेल्या PLI योजनेस मंजुरी दिली आणि पुढील 5 वर्षांसाठी 1.46 लाख कोटी रुपये वाटप केले.

वित्तमंत्र्यांनी प्रथम आत्मर्निभर योजनेंतर्गत केलेल्या घोषणांच्या प्रगतीची माहिती दिली. शेअर बाजारात सतत तेजी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांच्या क्रेडिट ग्रोथमध्ये 5.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा आरबीआयचा अंदाजही सकारात्मक आहे.

त्या म्हणाल्या की, रिकव्हरीमध्ये स्थिर वाढ दर्शवते. आत्मर्निभर भारत 1.0 विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना घेऊन आले आहेत. पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत लोनसाठी 26.2 लाख अर्ज केले गेले आहेत.

26 सेक्टर्ससाठी मोठी घोषणा असू शकते
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केव्ही कामत कमिटीने 26 सेक्टर्ससाठी केलेल्या शिफारसीनुसार पॅकेज येऊ शकते. या क्षेत्रांमधील कंपन्यांसाठी आपत्कालीन क्रेडिटची घोषणा केली जाऊ शकते. नव्या घोषणेअंतर्गत या कंपन्यांना हमीशिवाय कर्ज मिळेल. हे राहत पॅकेज कंपन्यांनुसार असेल, असे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात रक्कम जाहीर करणे अपेक्षित नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment