कोरोना संकटाच्या दरम्यान रेल्वेने केली विक्रमी मालवाहतुक, सर्वाधिक ‘या’ गोष्टींचे होत आहे लोडिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या महामारीमुळे सध्या फक्त मर्यादित प्रवासी गाड्याच धावत आहेत. 30 राजधानी स्तरीय गाड्या आणि 200 स्पेशल एक्सप्रेस किंवा मेल पॅसेंजर गाड्या भारतीय रेल्वेने चालवल्या आहेत. याचा परिणाम रेल्वेच्या कमाईवरही झाला आहे. आपली कमाई वाढवण्यासाठी आणि मालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे निरंतर कार्यरत आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय रेल्वेने 3.31 मिलियन टन वस्तूंची वाहतूक ऑगस्ट 2019 च्या तुलनेत केली. ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय रेल्वेने 91.02 मिलियन टन वस्तू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेल्या. त्याच वेळी, ऑगस्ट 2020 मध्ये, 94.33 दशलक्ष टन मालाची रेल लोडिंग झाली.

ऑगस्ट 2020 मध्ये, रेल्वे मालवाहतुकीने हे सामान वाहून नेले
भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2020 मध्ये एकूण 94.33 दशलक्ष टन लोडिंग केले. रेल्वेमध्ये सर्वाधिक 40.49 दशलक्ष टन कोळशाचे लोडिंग केले आहे..12.46 मिलियन टन लोखंड धातू, 6.24 मिलियन टन धान्य, 5.32 मिलियन टन खत, 4.63 मिलियन टन सिमेंट आणि 3.2 मिलियन टन खनिज तेलाचे लोडिंग केले आहे.

मालवाहतुकीतून मिळकत वाढवण्यासाठी रेल्वे हे पावले उचलत आहे
मालवाहतुकीसाठी रेल्वेने बरीच आकर्षक सूट जाहीर केली आहे. रेल्वे मालाला योग्य वेळेत इचछीत स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी माल ट्रेन,पार्सल ट्रेन आणि किसान ट्रेन चालवित आहेत. वस्तूंच्या गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी, एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देखील तयार केले जात आहे. एवढेच नव्हे तर रेल्वे शून्य बेस टाइम टेबल तयार करण्यातही व्यस्त आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment