90% सवलतीने नापीक जमीनीवर लावा सोलर पॅनेल आणि 25 वर्षांसाठी कमवा लाखो रुपये, अशाप्रकारे अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना चालवित आहे. या गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत कुसुम योजनेच्या मदतीने राजस्थानातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सोलर पंप देण्यात येत आहेत. त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावून शेतकरी आपल्या शेताचे सिंचन करू शकतात. हे सोलर पॅनेल बसविण्यासाठी शेतकर्‍यांना केवळ 10 टक्केच पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकार शेतकर्‍यांना बँक खात्यात अनुदानाची रक्कम देते.

सोलर पंप बनेल अतिरिक्त उत्पन्नाचे साधन
दिवसा सौर ऊर्जा आणि सिंचनासह स्वत: चे विद्युत सिंचन पंप चालवण्याचा फायदा शेतकर्‍यांना होऊ शकतो. आपण वीज वितरण कंपनीला (डिस्कोम) अतिरिक्त वीज विकून 25 वर्षे उत्पन्न मिळवू शकता. सौर ऊर्जेचा अवलंब केल्यास आपण डिझेलच्या खर्चापासून तसेच प्रदूषणापासून मुक्त व्हाल. सोलर पंपवर केंद्राकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 30 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. बँकांकडून 30 टक्क्यांपर्यंतचे कर्जही मिळू शकते. अतिरिक्त वीजनिर्मितीतून 5-6 वर्षात कर्जाची परतफेड होईल. सोलर पॅनेल 25 वर्षे चालतात आणि त्याची देखभाल देखील सोपी आहे. केंद्र सरकारच्या कुसुम योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण या वेबसाईटला भेट देऊ शकताः https://mnre.gov.in/#

कुसुम योजना म्हणजे काय?
भारतातील शेतकर्‍यांना सिंचनामध्ये बरीच समस्या भेडसावत आहेत आणि कमी-जास्त पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जेची उपकरणे व पंप बसवून आपल्या शेतात सिंचन करू शकतात. कुसुम योजनेच्या मदतीने शेतकरी त्यांच्या जागेवर सोलर पॅनेल्स लावू शकतात आणि तेथून निर्माण होणारी वीज शेतीसाठी वापरु शकतात. शेतकर्‍यांच्या जमिनीवर वीजनिर्मितीद्वारे देशातील खेड्यात अखंडित वीजपुरवठा सुरू केला जाऊ शकतो.

कुसुम योजनेचे दोन मोठे फायदे
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा शेतकर्‍यांना दोन प्रकारे फायदा होणार आहे. एक तर, त्यांना सिंचनासाठी विनामूल्य वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी अतिरिक्त वीज बनविली आणि ग्रीडवर पाठविली तर ते पैसे देखील कमवतील. जर एखाद्या शेतकर्‍याकडे पडीक जमीन असेल तर तो ती सौर उर्जा निर्मितीसाठी वापरु शकतो. यामुळे त्यांना नापीक जमीनीतून उत्पन्न देखील मिळू शकेल.

आपण किती पैसे कमवाल?
नापीक जमिनीवर सोलर प्लांट लावून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. वीज वितरण कंपनी (डिसकॉम) या सौर प्रकल्पातून तयार होणारी वीज खरेदी करेल. याद्वारे पुढील 25 वर्षांसाठी जमीन मालकाला प्रति एकर 60 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. सौर प्रकल्प उभारण्यासाठी जमीन वीज उपकेंद्राच्या पाच किमीच्या परिघात असावी. शेतकरी हा सोलर प्लांट स्वतः किंवा डेवलपरला भाड्याने देऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment