राज्यासमोर आर्थिक संकट; अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रिमंडळासमोर राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सादरीकरण केले. कोरोनाच्या संकटाबरोबरच राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात मोठा भार पडला आहे. राज्याला यावर्षी एक लाख १४ हजार कोटींची आर्थिक तूट आली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात सर्व विभागांनी आर्थिक काटकसर करावी, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सूचित केले.

राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादरीकरण केले. यावेळी आर्थिक स्थितीबाबतची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवली. करोना संकटात राज्याच्या अर्थसंकल्पाला कात्री लावावी लागली. आर्थिक तरतूद करोना संकटावर उपाययोजना करण्यासाठी करावी लागली. कोरोना संकटाच्या उपाययोजनांवर सुमारे १२ हजार कोटी रुपये दर महिन्याला खर्च करावा लागत होता.

तसेच २५ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजना राज्य सरकारने पूर्ण केली. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले, असे पवार यांनी सांगितले. प्रत्येक आमदारांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा आमदार निधीही या संकटात देण्यात आला. जिल्हा विकास नियोजनांचा निधीही देण्यात आला. अनेक अत्यावश्यक योजनांवर राज्य सरकारने खर्च केला असल्याचे पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं.

 

 

Leave a Comment