महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा! खासदार चिराग पासवान यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकारण जोरदार तापलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्र वादानंतर शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण तसंच कंगना प्रकरणावरुन चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीविषयी बोलताना चिराग पासवान म्हणाले की, “ज्याप्रकारे उत्तर भारतीयांना टार्गेट केलं जात आहे. कंगनाने प्रश्न विचारले म्हणून ज्याप्रकारे तिचं कार्यालय तोडण्यात आलं. तसंच फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून ज्याप्रकारे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली, असंच वातावरण कायम राहिलं तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय आहे. लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही.”

नेमकं प्रकरण तरी काय?
शुक्रवारी (11 सप्टेंबर) निवृत्त नौदल अधिकारी असलेले 62 वर्षीय मदन शर्मा यांना काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच एक व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलं होतं. याच रागातून काही शिवसैनिक त्यांन्या घरी गेले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment