बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल करतो! संजय राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल काल वाजलं आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. दरम्यान, शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.  याशिवाय बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी म्हटलं की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जाऊ शकतात. काल संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला होता. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली होती.

काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं होत. ते काल म्हणाले होते कि, देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.

बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्र आणि बिहार सरकार मिळून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत. तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, कामाचे मुद्दे नाही, सुशासनचा मुद्दा नाही, म्हणून मुंबईचे मुद्दे जबदस्तीने प्रचारात आणले आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये पडदा ओढण्याचं काम केलं त्यांनी राजीनामा दिला ते बक्समधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं आधीच ठरलं होत, त्यानुसार हे नाट्य पुढे चाललं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment