मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे! – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोकणात अजूनही मदत पोहोचली नसल्याचा आरोप राज्य सरकारावर केला आहे.

फडणवीस म्हणाले कि, कोकणात अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मदत मिळालेली नाही. तर ज्यांना मदत मिळाली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. तरीही कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो म्हणतो मदत नको पण केवळ कचरा साफ करून द्या. पण ही मुलभूत कामंही करण्यास प्रशासन तयार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. आज १ महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे? शेकडो गावांमध्ये वीज नसली तरी भरमसाठ बिले पाठवणे हा तर चक्रीवादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे फडणवीसांनी म्हटले.

कोकणवासियांना सध्या लहानसहान गोष्टींसाठीही एक-एक महिना वाट पाहावी लागत आहे. कोकण हा मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा कोकणाची ही अवस्था झालेय. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी कोकणाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment