‘मुख्यमंत्री नुसते आले आणि बघून गेले’, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली. मुख्यमंत्री आले आणि बघून गेले. मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं. याविषयी बऱ्याचं शेतकऱ्यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचंही राजू शेट्टींनी सांगितलं आहे. (Raju Shetty’s criticize Uddhav Thackeray’s visit)

नुकसान टाळता आलं असतं- शेट्टी
नैसर्गिक आपत्तीमुळे तर नुकसान झालेच, पण तांत्रिक चुकादेखील झाल्या आहेत. हे नुकसान टाळता आलं असतं. ८ दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा इशारा दिला होता, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही उजनीतून पाणी सोडलं नाही. सोलापूरचा जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग कोलमडून पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचाही बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी “शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“अंदाज घेऊ, माहिती घेऊ, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु”
“घाबरु नका, सावध राहा. त्यामुळे मी म्हणून घोषणा केली नाही. हे करू ते करू, अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु. पंचनामे सुरू आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.हे संकट अजूनही टळलेलं नाही. धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संकटाचा काळ संपेपर्यंत घाई करता येत नाही. गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतो आहे. दोन तीन दिवस धोका आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment