राज्यात महाविकास आघाडीही मोफत कोरोना लस देईल – नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने सत्ता आल्यानंतर मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे इतर अनेक राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यातच कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस देईल असं राज्याचे राज्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाची जी साथ वाढलीय त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी घेतलेले निर्णयच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मलिक म्हणाले, जानेवारी महिन्यातच आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि सागरी मार्ग बंद केले असते तर कोरोनाचा शिरकाव देशात झालाच नसता. आज जे हजारो मृत्यू आणि संसर्ग पसरत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील वक्फ बोर्ड कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यापूर्वी प्रियांका चतुर्वेदी यांनीही भाजपवर निशाणा साधला होता

भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाजपवर टीकेची तोफ डागली होती. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment