मित्रानेच केला घात ! जुन्या वादातून तरुणाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादाक घटना घडली आहे. यामध्ये मित्रच वैरी निघाला आहे. जुन्या वादातून मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. हि घटना ९ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील असर्जन या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मृत तरुणाचे नाव हरमितसिंग रेखासिंग पुजारी असे आहे. काही दिवसांपूर्वी मृत हरमितसिंग याचा त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून त्याच्या मित्राने हरमितसिंगची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे.घटनेच्या दिवशी हरमितसिंगचा मित्र आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांनी हरमितसिंगला असर्जन शिवारातील एस. पी. बियंटर्सच्या कंपाऊंडमध्ये बोलावले. त्या ठिकाणी आकाश वसंतराव जाधव आणि कृष्णा पांडू आगलावे यांच्यासोबत अन्य दोघेजण उपस्थित होते. त्यानंतर या सर्वांनी मिळून हरमितसिंगचा दोरीने गळा आवळला ज्यामध्ये हरमितसिंगचा जागीच जीव गेला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ ते 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांतमध्ये लावला. सोमवारी सकाळी पोलिसांनी २ आरोपीना ताब्यात घेतले आहे तर बाकी दोघांचा तपास सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment