1 ऑगस्टपासून आपल्या पैशाशी संबंधित ‘हे’ 5 नियम बदलणार, आता आपल्या खिशावर होणार थेट परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 ऑगस्टपासून (1st August Financial Changes) अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये बर्‍याच गोष्टी स्वस्त होतील. या बदलांमध्ये बँकेचे कर्ज, पीएम किसान योजना, किमान शिल्लक शुल्क आकारणे याचा समावेश आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधीची माहिती देत ​​आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

  1. कार आणि दुचाकी खरेदी होणार स्वस्त
    मोटार वाहन विमा नियम बदलल्यास आता पुढील महिन्यापासून नवीन कार किंवा बाईकची किंमत थोडी स्वस्त होईल. याचा कोरोना कालावधीतील कोट्यावधी लोकांना फायदा होईल. इर्डा म्हणाले की, दीर्घकालीन पॅकेज पॉलिसीमुळे नवीन वाहन खरेदी करणे लोकांसाठी महागडे ठरते. 1 ऑगस्ट नंतर आपल्याला नवीन कार किंवा मोटरसायकल खरेदी करायची असल्यास आपणास आता वाहन विम्यावर कमी पैसे खर्च करावे लागतील. भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण ( IRDAI ) ‘मोटर थर्ड पार्टी’ आणि ‘ऑन थर्ड डॅमेज इन्शुरन्स’ संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. IRDAI च्या सूचनेनुसार, त्यानंतर नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे कार विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही.
  2. किमान शिल्लक आणि व्यवहार नियमात बदल
    अनेक बँकांनी त्यांचे रोख शिल्लक आणि डिजिटल टान्सझॅक्शन वाढवण्यासाठी 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच या बँकांमध्ये तीन फ्री टान्सझॅक्शननंतर शुल्कदेखील आकारले जाईल. हे शुल्क 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेत लागू होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेधारकांना आता त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात किमान 2 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे, जे आधी 1,500 रुपये होते. उर्वरित रक्कम 2,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम -शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये आकारेल.
  3. पंतप्रधान-किसान रक्कम 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येईल
    मोदी सरकारने गरीब, दुर्बल आणि लहान धारणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पाचवा हप्ता जमा केलेला आहे. आता 1 ऑगस्ट रोजी या योजनेंतर्गत मोदी सरकार 2000 रुपयांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे. या पंतप्रधान किसान योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 रोजी जाहीर करण्यात आला. ही योजना सुरू झाल्यापासून सरकारने देशातील 9.85 कोटी शेतकर्‍यांना रोख रकमेचा लाभ दिला आहे.
  4. RBL बँक बचत खात्याचे नियम बदलले
    RBL ने अलीकडेच आपल्या बचत खात्यातील व्याज दरात बदल केला आहे. हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. आता तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावर वर्षाकाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर 1-10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के आणि 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जाईल. जर डेबिट कार्ड हरवले किंवा खराब झाले तर 200 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, आता आपल्याला टायटॅनियम डेबिट कार्डसाठी दरवर्षी 250 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ग्राहक आता महिन्यातून 5 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात.
  5. ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाच्या कंट्री ऑफ ओरिजिनबद्दल माहिती द्यावी लागेल
    1 ऑगस्टपासून ई-कॉमर्स कंपन्यांकडून (E-commerce companies) ते पुरवित असलेले प्रॉडक्ट कोठे तयार केले जाते हे सांगणे आवश्यक असेल. परंतु बर्‍याच कंपन्यांनी ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मिंट्रा, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे.डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड (डीपीआईआईटी) ने बुधवारी सांगितले की, सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या सर्व न्यू प्रॉडक्ट लिस्टिंग चे कंट्री ऑफ ओरिजन (country of origin) 1 ऑगस्टपर्यंत अपडेट करावा लागेल. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment