पत्रकारांनाही मिळणार कोरोना पासून सुरक्षा कवच, ‘या’ नेत्याने दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : देशात कोरोना खूप झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पत्रकार देखील आपल्या जीवाची जोखीम बाळगून काम करत असतात. त्यामुळे पत्रकारांनाही कोरोना लस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. आता त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत विनंती केली होती की, ” आज आपल्या एका पत्रकार मित्राचे करोना मुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात. समाजाला जागृत ठेवत असतात त्यांना लस देणं जरुरीचं आहे त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती. ”

तसेच त्यांनी आज काही तासांपूर्वी या ट्वीट ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्याचे ट्वीट करून कळवले आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, ” पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी या मागणीला माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असं त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे. ” आशा असल्याचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

त्यामुळे लवकरच राज्यातील पत्रकारांना देखील लसीकरण केले जाईल अशी आशा आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment