शरद पवार हे काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत का?; गुणरत्न सदावर्ते यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “आजची जी बैठक झाली ती लाजिरवाणी होती. एसटीच्या विलीनीकरणाची ज्या ६७ जणांनी हुतात्म्य पत्करले. त्याच्या मृत्यूबाबत पवारांनी आज साधा ब्र शब्दही काढला नाही. शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे काय? असा सवाल करीत सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला.

अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीव घालवले त्यांच्याबद्दल काहीही बोलले नाहीत. शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब हे मुख्यमंत्र्यांकडे का गेले नाही? ते का शरद पवार यांच्याकडे गेले.

माझ्याकडे 75 हजार कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही काहीही काळजी करू नये. शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे बघत आहेत. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवारही जबाबदार असतील. आजच्या बैठीकीतील चित्र पाहता चर्चा करण्यासाठी गेलेले युनियनचे लोक आधी शरद पवारांकडे बघत होते. आणि मग स्तुतिसुमनं उधळत होते आम्ही दुखवट्यामध्ये आहोत, अशी टीकाही यावेळी सदावर्ते यांनी केली

Leave a Comment