गर्लफ्रेंडला रात्रीच्यावेळी भेटायला त्याने केला ४५ कि.मी. सायकल प्रवास; माघारी आला तेव्हा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील जौनपूर हे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे.येथील मीरगंज पोलीस स्टेशन परिसरातील लोकांना या लॉकडाउनमध्ये आपल्या घरातच राहायला भाग पाडले जात आहे,पण तरीही असे काही लोक आहेत जे आपल्या मैत्रिणीला किंवा भावी पत्नीला भेटण्याच्या इच्छेने लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत.अशीच एक घटना या जिल्ह्यात समोर आली आहे.येथे एक तरुण आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी रात्रीच ४५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिच्या घरी पोहोचला.

पण परत आल्यावर मात्र तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही.जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने खूप विनवणी करण्यास सुरवात केली, त्यानंतर पोलिसांनी त्याला कडक शब्दांत समझ दिली आणि मग तो तेथून निघून गेला.खरं तर, जलालपूरचा हा तरुण मंगळवारी रात्री मीरगंजमधील एका गावात सायकल चालवत आपल्या पत्नीला भेटायला आला. यानंतर,तो रात्री तीन वाजण्याच्या सुमारास परत येत होता,तेव्हा अडारी येथे डॉयल ११२ पोलिसांना तो दिसला.

जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने सगळे सत्य सांगितले.लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे अवघड असल्याचे तो म्हणाला.त्यामुळे तो रात्रीच घराबाहेर पडला आणि ४५ कि.मी.चा प्रवास करून तो आपल्या भावी पत्नीला भेटायला आला.या युवकाने सांगितले की त्याची भावी पत्नी आजारी आहे, त्यामुळे तिला औषध देण्यासाठी आलो होतो.बरीच विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याला समज दिली.ज्या मुलीची भेट घेण्यासाठी तो तरुण पोहोचला होता तिच्याबरोबर लग्न होणार असल्याचे पोलिसांनी त्याने सांगितले. मात्र लॉकडाऊनमुळे लग्नाला उशीर होणार आहे म्हणून तो उशिरा रात्री तिला भेटायला सायकलवरून तिच्या घरी पोहोचला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment