शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र लढल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजून 1 महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आगामी निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, भाजप आणि काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही?? महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र लढावं लागेल. आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात नक्कीच चमत्कार होईल,” असं राऊत म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करत आहेत. तसेच हायकमांडने सांगितले तर आपली मुख्यमंत्री होण्याचीही तयारी आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment