“ऊस शिल्लक राहिल्यास कारखानदारांच्या घराबाहेर आंदोलन करणार” – स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत. अद्यापही 20 ते 25 हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक आहे. संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिल्यास कारखानदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले,” जिल्ह्यात मिरज, वाळवा, पलूस, कडेगांव, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी जत या सर्वच तालुक्यातील उसाचे क्षेत्र लाख ते सव्वा लाख हेक्टरवर आहे. त्यातील सुमारे एक लाख हेक्टरवरील उसाचे गाळप झाले आहे. अद्यापही 20 ते 25 हेक्टरवरील ऊस अद्याप बाकी आहे. कारखाने बंद पडले. त्यामुळे ऊस गाळप झालेला नाही. ऊस शिल्लक राहणार असल्याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे सर्व कारखान्यांना सूचनाही दिल्या होत्या. मात्र काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याची तयारी सुरू केली आहे.”

दत्त इंडिया कारखान्याने 31 मार्चला कारखाना बंद करण्याचे जाहीर निवेदन दिले आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी अभिजित चौढरी यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची बैठक घेवून ऊस संपेपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत, अशा स्पष्ट सूचना द्याव्यात. अन्यथा जे कारखाने बंद करतील. त्या साखर कारखान्याचा अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष खराडे यांनी दिला.

Leave a Comment