जर तुम्ही अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर होईल कडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत आणि तरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार आता पूर्ण रक्कम वसूल करत आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार आहेत
तुमच्या घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य पीएम किसान अंतर्गत हप्ता घेत असतील तर तुम्हाला हप्त्याचे पैसे 2000 रुपये परत करावे लागतील.

समजा एका कुटुंबातील एकाच जमिनीवर आई, वडील, पत्नी आणि मुलगा यांना पीएम शेतकऱ्याचा हप्ता मिळत असेल तर त्यांना सरकारला पैसे परत करावे लागतील. नियमांनुसार, पीएम किसान अंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला हप्ता मिळू शकतो. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकरणात त्याला तुरुंगातही जावे लागू शकते.

नियम काय आहेत जाणून घ्या
सरकारने या योजनेच्या जुन्या पद्धतीत काही बदल केले आहेत. आता ज्यांच्या नावावर शेती असेल त्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीप्रमाणे यापुढे वडिलोपार्जित जमिनीत वाटा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याही नावावर शेत असेल तर हे काम त्वरित करा, अन्यथा तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो.

‘या’ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने टॅक्स भरला तर त्याला योजनेचा लाभ दिला जात नाही.
ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
जर एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल तर त्यालाही पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेबाहेर ठेवण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

Leave a Comment