India Mobile Congress 2021: 5G लागू करणे हे भारताचे पहिले प्राधान्य असावे – मुकेश अंबानी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठा टेक्नोलॉजी इवेंट इंडिया मोबाइल काँग्रेस 2021 ची पाचवी आवृत्ती बुधवार, 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. मुकेश अंबानी म्हणाले की,”भारतात मोबाईल आणि डिजिटल क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. कोविड नंतर भारतातील एका गंभीर वळणावर ही परिषद होत आहे.”

RIL चे CMD मुकेश अंबानी म्हणाले की,”एकीकडे भारत आपल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेत अभूतपूर्व प्रगती करत आहे. तर दुसरीकडे, अर्थव्यवस्थेला पुन्हा उच्च वाढीच्या मार्गावर आणण्यासाठीच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे. या दोन मोठ्या कामांच्या यशात आमच्या उद्योगाचे योगदान महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे की भारत भविष्यात कोविडच्या कोणत्याही लाटेवर नियंत्रण फक्त मिळवण्यात यशस्वी होणार नाही तर जगाला चकित करणारे जलद आर्थिक पुनरागमनही करेल.”

“आम्ही 100% नेटिव्ह आणि व्यापक 5G सोल्यूशन विकसित केले आहे”
5G बद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की,” आम्ही 100% नेटिव्ह आणि सर्वसमावेशक 5G सोल्यूशन विकसित केले आहे, जे पूर्णपणे क्लाउड नेटिव्ह, डिजिटल मॅनेज्ड आणि भारतीय आहे. आमच्या तंत्रज्ञानामुळे, Jio नेटवर्क लवकरात लवकर 4G वरून 5G वर अपग्रेड केले जाऊ शकते.”

मुकेश अंबानी यांनी देशात मोबाईल सबसिडी देण्यासाठी सरकारी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाचा वापर करण्याची वकिली केली आहे. देशातील उपेक्षित लोकांना देशाच्या डिजिटल विकासाचा भाग बनवायचे असेल तर त्यांना स्वस्त दरात सेवा आणि उपकरणे उपलब्ध करून दिली पाहिजेत, असे त्यांचे मत आहे.

“2G वरून 4G आणि नंतर 5G मध्ये लवकरात लवकर मायग्रेशन पूर्ण केले जावे”
मुकेश अंबानी म्हणाले की,”भारताने लवकरात लवकर 2G वरून 4G आणि नंतर 5G मध्ये मायग्रेशन पूर्ण केले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांना सामाजिक-आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी 2G पर्यंत मर्यादित ठेवणे त्यांना डिजिटल क्रांतीच्या फायद्यांपासून वंचित ठेवत आहे. कोविडमध्ये आम्ही पाहिलं, जेव्हा सगळं बंद होतं, तेव्हा फक्त इंटरनेट आणि मोबाईलनेच आपल्याला जिवंत ठेवलं होतं. तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा आणि रोजगाराचा आधार बनला.”

हा कार्यक्रम 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे
हा उपक्रम 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात टेक जगताशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. 5G तंत्रज्ञानासह OTT कन्टेन्टवरही या कार्यक्रमात चर्चा केली जाईल.

IMC च्या अधिकृत वेबसाईटनुसार, या कार्यक्रमाला वक्ते म्हणून कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव, भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल आणि बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह इतर अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी, नोकिया आपल्या प्रॉडक्ट्सपैकी एकाचे अनावरण करेल आणि त्याचा डेमो दाखवेल. या प्रॉडक्ट्सचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

Leave a Comment