Inspirational Story : NRI पतीने लग्नानंतर न्यझीलंडला सोडून गेला; खचून न जाता ती बनली IAS अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप मोठी गोष्ट समाजामध्ये समजली जाते. असाच कठीण प्रसंग कोमल गणात्रा या महिलेवर आला. पण त्यांनी धीरगंभीर होऊन एक निर्णय घेतला तो म्हणजे UPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे!

कोमल गणत्रा यांचे लग्न एका एनआरआय मुलाशी झाले होते. लग्न झाल्यावर त्यांनाही आपले आयुष्य पूर्ण झाल्यासारखे वाटले. पण तसे झाले नाही. नवरा मुलगा लग्नानंतर पंधरा दिवसात परत न्यूझीलंडला गेला. यांना खूप वाईट वाटले पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न मनात पक्के केले होते. त्यांनतर त्यांनी परीक्षा दिली व त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

गुजराती मीडियममधून कोमल लग्नाच्या वर्षीच साहित्याच्या विषयात टॉपर म्हणून यशस्वी झाल्या. लग्नाआधी त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. कोमल यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे. सोबतच त्यांनी तीन वेगवेगळ्या भाषांची तीन विद्यापीठांमधून पदवी मिळवली आहे. गुजरात लोक सेवा आयोगाची मुख्य परीक्षाही पास केली होती. मात्र त्यावेळी पतीनं त्यांना मुलाखतीसाठी जाण्याची परवानगी दिली नव्हती. कोमल सद्ध्या रक्षा मंत्रालयात एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment