हे तर कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे ; भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. यावरून आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसलेले असताना सर्वाधिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. शनिवारीही भंडारा येथे घडलेल्या दुर्देवी घटनास्थळी तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण आहे असं भाजपाने म्हटलं आहे.

ठाकरे सरकार कडून देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात केली आहे. राज ठाकरे यांना झेड (z) दर्जाची सुरक्षा होती. ती काढून त्यांना आता वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment