“महाविकास आघाडीतील जास्तीत जास्त मंत्री अटक व्हावे हे भाजपचे स्वप्न”; जयंत पाटील यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जातात त्यांना विरोध करणार्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील जास्तीत जास्त मंत्री अटक व्हावेत असे भाजपचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न चालले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

आज मुंबईत मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप चुकीच आहेत. ज्याने जागा खरेदी केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे. मलिक यांच्यावर करण्यात आलेले आरोप आहेत त्यांना नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळ ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील.

भाजपचे लोक दररोज काहींना काही तरी करून मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणत्याना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जात आहेत कशा प्रकारे महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री कशा पद्धतीने तुरुंगात जातील, याचे स्वप्न भाजप नेते पाहत आहेत. मात्र, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Comment