ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव; जयंत पाटलांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच सध्या ईडीच्या कचाट्यात सापडलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ईडी, सीबीआयसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना केवळ आकसापोटी बदनाम करण्याचे काम केले जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही भाष्य केले. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही जयंत पाटील यांनी म्हंटल.

Leave a Comment