कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा आरोप, आदित्य ठाकरेंवरही साधला थेट निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद समोर येत आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणा नंतर कंगना आक्रमक झाली असून ती बॉलीवूड मधील घराणे शाही आणि ड्रग रॅकेट, गुंड माफिया यांच्याबद्दल बोलत आहे. त्यातच मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटत आहे असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवसेना विरुद्ध कंगना असा वाद रंगला आहे. मुंबई महापालिकेने कंगणाच्या ऑफिस वर कारवाई केल्यानंतर कंगना भलतीच खवळली होती. कंगना रणौत मुंबईवरून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने पुन्हा आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने पुन्हा आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment