गुणरत्न सदावर्तेंमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुणरत्न सदावर्ते यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली असे म्हणत सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला.

कृती समितीचे सदस्य अजय गुजर म्हणाले, सदावर्ते यांना आपण पत्र लिहिलं असून त्यात आता तुम्ही आमची बाजू मांडण्याची गरज नसल्याचं सांगितलं. आम्ही त्यांची वकील म्हणून नेमणूक करून मोठी चूक केली. आता चूक सुधारून नवीन वकील नेमले आहेत. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सतीश पेंडसे हे नवीन वकील नेमले असल्याचं गुजर यांनी सांगितले.

एसटी कृती समितीचे सदस्य सुनिल निर्भवणे यांनी देखील गुणरत्ने सदावर्ते यांच्यावरजोरदार टीका केली. सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये असावेत त्यामुळे लोकांना भडकावण्याचं काम सुरु आहे. सदावतेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. असा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment