‘देवेंद्र यांच्या नशिबात काय ते सटवीलाच माहित’; शेलारांची खंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। राज्यातील सत्तानाट्याचा समारोप झाल्यानंतर अखेर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे नाना पाटोळे यांची विधानसभा अध्यक्षपदी, तर देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी फडणवीसांचे कौतुक करताना मनातील खंतही बोलून दाखवली.

‘देवेंद्रजींच्या नशिबात काय लिहिलंय ते त्या सटवीला माहिती’ अश्या शब्दात शेलारांनी मनातील खंत बोलून दाखवली.  तसेच ‘वसंतराव नाईकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षे कालवधी पूर्ण करण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांनी केला, तर दुसऱ्या टर्ममध्ये सर्वात कमीकाळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावे जमा झाला’ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment