राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर तीन महिन्यांत सातबारा कोरा करणार – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । युती शासनाने शेतकऱ्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असून सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की,’सत्ताधाऱ्यांना सत्तेची नशा आली आहे. दारू विकणाऱ्या उमेदवारांना नीट वाचता येत नाही तर विधानसभेत शपथ काय घेणार..? असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला विचारला. शेतकऱ्यांना हे सरकार साले म्हणतात. युतीचे सरकार हे दळभद्री असून शेतकऱ्यांना मातीत घालणारे आहे. पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था केली असून कर्जमाफीच्या नावाखाली तीन वर्षापासून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. अशी टीका त्यांनी भाजप सरकार वर केली.

मोहोळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न पूर्ण शिरापूर उपसा सिंचन, सिना भोगावती नदीजोड प्रकल्प , तालुक्यासाठी एमआयडीसी त्याचप्रमाणे बारामती प्रमाणे तालुक्यात आहे विकास करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. यावेळी मोहोळ तालुक्यातील नागरिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar | तर ३ महिण्यांत सात बारा कोरा करणार - अजित पवार

Leave a Comment