हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत नरसिम्हानंद यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचा वादग्रस्त दावाही त्यांनी केला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना करोनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली.
ते म्हणाले की, मास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. मी मास्क लावत नाही. कोरोना आहे असं मला वाटत नाही. ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात असं त्यांनी सांगितले
महंत नरसिम्हानंद यांनी मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं वक्तव्य केलं. जिथे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या वाढलीय तिथे ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. लोकांनी हिंदू नेत्यांवर भरोसा ठेऊन नये, असंही महंत नरसिम्हानंद यांनी म्हटलं आहे. प्रत्येक हिंदूने कमीत कमी पाच ते सहा मुलांना जन्म दिला पाहिजे असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.