‘तिळगुळ घ्या, अन् चौकीदार चोर आहे बोला’ – जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या विद्यमान सरकारवर ऐन केन प्रकारे टिका करण्याची कसलीही संधी सोडतांना दिसत नाही आहेत. त्यात केंद्रातील मोदी सरकार म्हंटल की आव्हाड हे हमखास आपल्या खास शैलीत टिका करतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी ‘मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत’ अशी टिका केली होती.

मकर संक्रांत या सणाच्या ‘तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला’ या लोकप्रिय ओळीवरुन त्यांनी ‘तिळगुळ घ्या, अन् चौकीदार चोर आहे बोला’ अशी टिका आमदार आव्हाड यांनी सध्या राफेल प्रकारणावरून अडचणीत सापडलेल्या केंद्र सरकारला उद्देशून केली आहे. ‘मी देशाचा चौकीदार आहे’ ह्या  विधानावरून सध्या पंतप्रधान मोदी यांच्यावर अनेक प्रकारे टिका होत आहे. त्यांचा सहयोगी असलेला ‘शिवसेना’ या घटक पक्षाने सुद्धा त्याच्या या विधानवरुन त्याच्या वर नुकतीच टिका केली होती.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment