यवतमाळ | सतिश शिंदे
झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदी पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, झरी जामनी तालुक्यामधील राजूर (गो) या ठिकाणी मोहरमनिमित्त आदिलाबाद येथून ५ युवक आले होते. दरम्यान बुधवारी ते पैनगंगेच्या पाण्यामध्ये स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढत होते. नदीच्या मध्यभागामध्ये जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल गेला आणि नाव उलटून हे युवक पाण्यात बुडाले. मोहरमसाठी हे पाचही जण या झरी जामनी तालुक्यामधील राजूर ( गो ) या ठिकाणी आले असताना ही दुर्देवी घटना घडली.
या अपघातामधे शेख अर्षद वय (१४), शेख सुफीर सिराज वय (१६) या दोघांचा पाण्यात असतानाच मृत्यू झाला. सय्यद उमेद वय (१८) हा गंभीर आहे. या पाच युवकांपैकी दोन युवकांनी पोहत जावून किनारा गाठल्यामुळे ते या घटनेतून बचावले आहेत.