ऊसाच्या शेतातील आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणचे शेतकरी संजय एकनाथ चौधरी आपल्या ऊसाच्या शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते, मात्र आगीत होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या तारांची ठिणगी पडल्यामुळे हि आग लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी संजय चौधरी यांचा मृत्यू झाल्याच्या संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काय आहे प्रकरण?
नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा या ठिकाणी ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना त्या आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. संजय एकनाथ चौधरी असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?
सोमवारी संध्याकाळी चौधरी यांच्या ऊसाच्या शेताला आग लागली होती. या वावराच्या शेजारीच गव्हाचे क्षेत्र होते. ही आग गव्हाच्या शेतात लागू नये म्हणून यासाठी संजय चौधरी हे आग विझवण्यासाठी गेले. मात्र दुर्दैवाने आग विझवतांना चौधरी आगीच्या ज्वाळांमधे सापडले आणि त्या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment