संचारबंदीसाठी औरंगाबाद मनपाची ‘मास्टर प्लॅनिंग’, अधिकारी उतरले रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलिस, महसुल प्रशासनाने ‘मास्टर प्लॅनिंग’ केली आहे. या काळात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अधिकाऱ्यांची टिम रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दिवस-रात्र हे अधिकारी अचानक भेट देऊन गस्त घालणार आहेत.

१८ जुलैपर्यंत असणाऱ्या संचारबंदीला सुरूवात झाली आहे. संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिलेला आहे.संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांद्वारे पालन होत आहे कि नाही, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाली आहे. शुक्रवारी संचारबंदिच्या पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे.

यात महानगरपालिकेचे ४४० कर्मचारी, १० प्रभाग अधिकारी तसेच विभागप्रमुख, २० सुपरवायझर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०० टिम यासाठी सज्ज करण्यात आली आहे. परिस्थितीबद्दल वेळोवेळी माहिती देण्याचे या टिमच्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाईलवर रेकॉर्डींग करून टिमचे सदस्य अधिकाऱ्यांना माहितीz पोहचविणार आहे.

अधिकारी वर्ग ‘ ऑन फिल्ड ‘

संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबरच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हे आता मैदानात उतरणार आहेत. मनपा आयुक्त पाण्डेय हे सायंकाळी तर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर हे रात्रीच्या वेळी परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी हे हि अचानक अनेक भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Leave a Comment