नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर पुन्हा जीभ घसरली, ‘पनवती!’ असा केला उल्लेख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर २ तासांनी वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु झाला आहे. दरम्यान, मुंबईत परिस्थिती आता हळुहळु पूर्वपदावर येत असली तरीही विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असून ते राज्यासाठी पनवती असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.

ट्विटरवर मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेवर बोलताना नितेश राणे म्हणाले कि,”काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे! मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून आतापर्यंत जे कधी नाही झालं ते सगळं होत आहे. आता फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे राहिले आहेत…ते ही दिसतील कदाचित.. पनवती!” असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

आज सकाळी महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत वीज बंद झाली होती. अखेर दोन तासांनंतर दक्षिण मुंबई व उपनगरांत तसंच, ठाणे, कल्याण भागांत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं ठप्प झालेली लोकलसेवादेखील आता पूर्वपदावर येतेय. हार्बर रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवर व पश्चिम रेल्वेही सुरू पुन्हा सुरळीत झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरचे सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणाही पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल दोन तासांच्या खोळंब्यानंतर मुंबईत काही प्रमाणात पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. काही शासकीय कार्यालयातही वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment